चिपळूण येथे हिंदु जनजागृती समितीची आंदोलनाद्वारे मागणी

चिपळूण, ११ डिसेंबर (वार्ता.) – मार्च २०२५ मध्ये ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ व्हावा, या मागणीसाठी महिलांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राज्यात १ लाखाहून अधिक ‘लव्ह जिहाद’च्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत’, असे सांगितले. ही वस्तूस्थिती असतांना आतापर्यंत हिंदु जनतेकडून मागणी करूनही महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा झालेला नाही. यासाठी ‘चालू हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद्यांना कठोर शिक्षा करणारा कायदा महाराष्ट्रात झालाच पाहिजे’, अशी मागणी करणारे आंदोलन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले. शहरातील खेडेकर क्रीडा संकुलासमोर १० डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता हे लक्ष्यवेधी आंदोलन झाले. या आंदोलनात विविध संघटना, संप्रदाय आणि सर्वसामान्य हिंदु महिला अन् युवती यांची मोठी उपस्थिती होती.
या वेळी महिला प्रतिनिधींनी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ होण्यास महाराष्ट्र शासनाने विलंब न करता तो लवकरात लवकर करावा’, अशी मागणी तीव्रतेने केली.
या आंदोलनात हिंदु राष्ट्र समन्वय समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदु परिषद, शिवसेना, भाजप, ग्रामदैवत कालभैरव सांस्कृतिक मंच, संस्कार भारती, सनातन संस्था आदी विविध संघटना, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदु बंधूभगिनी उपस्थित होते.
आंदोलनाच्या शेवटी चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’विषयी मागणीचे निवेदन देण्यात आले.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान