राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘कधी येशील मनमोहना ।’ या गीताच्या शेवटी आश्वासक ओळी जोडून साधकांना आश्वस्त करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ‘कधी येशील मनमोहना ।’ हे गीत रचले आहे. वर्ष १९९९ मध्ये त्या गीताच्या शेवटी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आणखी काही ओळी जोडल्या. त्यांनी शेवटच्या ओळीत ‘तो पहा आला मोहन ।’ , असे लिहिले आहे. या ओळींतून त्यांनी ‘धर्मसंस्थापनेसाठी मोहन आला आहे’, असे सूचित केले आहे.

त्यांनी स्वतः असे लिहून त्या माध्यमातून साधकांना आश्वस्त केले आहे आणि ‘तो मोहन म्हणजे कोण आहे ?’, याची अनुभूतीही साधकांनी घेतली आहे. (टीप) परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक प्रसंगांतून साधकांना आश्वस्त केले आहे. त्यातीलच हा एक प्रसंग आहे. त्याबद्दल परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

(टीप : ‘महर्षींनी नाडीपट्टीत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत’, असा उल्लेख केला आहे.’ – संकलक)

– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२५)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक