
‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ‘कधी येशील मनमोहना ।’ हे गीत रचले आहे. वर्ष १९९९ मध्ये त्या गीताच्या शेवटी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आणखी काही ओळी जोडल्या. त्यांनी शेवटच्या ओळीत ‘तो पहा आला मोहन ।’ , असे लिहिले आहे. या ओळींतून त्यांनी ‘धर्मसंस्थापनेसाठी मोहन आला आहे’, असे सूचित केले आहे.
त्यांनी स्वतः असे लिहून त्या माध्यमातून साधकांना आश्वस्त केले आहे आणि ‘तो मोहन म्हणजे कोण आहे ?’, याची अनुभूतीही साधकांनी घेतली आहे. (टीप) परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक प्रसंगांतून साधकांना आश्वस्त केले आहे. त्यातीलच हा एक प्रसंग आहे. त्याबद्दल परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
(टीप : ‘महर्षींनी नाडीपट्टीत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत’, असा उल्लेख केला आहे.’ – संकलक)
– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२५)
|
यांसाठी मंदिरांचे सरकारीकरण नको !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !