
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ राज्य देशातील पहिले ‘अत्यंत गरिबीमुक्त’ राज्य झाले आहे, अशी घोषणा केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी विधानसभेत केली.
१. राज्यातील अत्यंत गरिबी दूर करण्यासाठी विजयन् सरकारने वर्ष २०२१ मध्ये ‘अत्यंत गरिबी निर्मूलन प्रकल्प’ चालू केला. या कार्यक्रमांतर्गत ६४ सहस्र ६ कुटुंबांची ओळख पटवण्यात आली. गेल्या वर्षांत या कुटुंबांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढण्यात आले आहे.
२. या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांचा दावा फसवा असल्याचे सांगत विरोधकांनी सभागृहातील कामकाजावर बहिष्कार टाकला. विधानसभेचे विशेष अधिवेशन प्रारंभ होताच सर्व विरोधी आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला.
३. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देतांना मुख्यमंत्री विजयन् म्हणाले की, आम्ही केवळ तेच बोलतो जे आम्ही कार्यवाहीत आणू शकतो. आम्ही जे सांगितले, ते आम्ही कार्यवाहीत आणले आहे. हे आमचे विरोधी पक्षनेत्यांना उत्तर आहे.
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी