Siddaramaiah On RSS : (म्हणे) ‘सनातनवाद्यांची संगत नको, संघापासून दूर रहा !’

  • कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा विद्यार्थ्यांना सनातनद्वेषी सल्ला

  • मुलांच्या मनात सनातनद्वेष पसरवण्याचा प्रयत्न

हिंदुधर्म द्वेषी सिद्धरामय्या

मैसुरू (कर्नाटक) – लोकांनी सनातनींचा सहवास टाळावा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सावध रहावे; कारण त्यांनी नेहमीच डॉ. भीमराव आंबेडकर अन् त्यांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेचा विरोध केला आहे, असे सनातनद्वेषी विधान कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. ‘तुमची संगत चांगली ठेवा. समाजाच्या भल्यासाठी काम करणार्‍यांशी संबंध ठेवा, सामाजिक पालटाला विरोध करणार्‍यांशी नाही’, असा सल्लाही सिद्धरामय्या यांनी दिला. ते मैसुरू विद्यापिठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘विश्वज्ञानी आंबेडकर सभागृहा’च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात रा.स्व. संघाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. त्यानंतर राज्य सरकारने संघाच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिद्धरामय्या पुढे म्हणाले की,

१. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांवर सनातनवादी मानसिकतेच्या व्यक्तीने बूट फेकणे, हे समाजात हितसंबंध जोपासणारे लोक आणि सनातनवादी अजूनही आहेत, याचा स्पष्ट पुरावा आहे. या घटनेचा केवळ दलितांनीच नव्हे, तर प्रत्येकाने एकमताने निषेध करायला हवा, तरच समाज पालटण्याच्या मार्गावर आहे, असे आपण समजू शकतो,

२. ‘काँग्रेसने आंबेडकरांना निवडणुकीत हरवले’, असा अपप्रचार संघवाले करत आहेत; परंतु ‘मला सावरकर आणि कॉम्रेड डांगे यांनी हरवले’, असे आंबेडकरांनी स्वतः लिहून ठेवले आहे. (हे कुठे लिहून ठेवले आहे, हे सिद्धरामय्या यांनी सांगायला हवे. अन्यथा तेच खोटी माहिती समाजासमोर ठेवत आहेत, असेच म्हटले जाईल ! – संपादक) त्यामुळे खोटी माहिती समाजासमोर ठेवून सनातनवाद्यांचा डाव उघड करायला हवा.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे भाषांतरित ट्विट आणि मूळ (कन्नड भाषेतील) ट्विटची लिंक –

https://x.com/siddaramaiah/status/1979479206359634304

संघाची मानसिकता तालिबानसारखी ! – सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र

यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांनी राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, संघाची मानसिकता तालिबानसारखी आहे. (तसे असते, तर यतींद्र असे बोलण्याचे धाडस करू शकले असता का ? आणि जरी असे धाडस केले असते, तर ते जिवंत राहू शकले असते का ? – संपादक) ज्याप्रमाणे तालिबान इस्लामचे तत्त्व लादण्यासाठी ‘फर्मान’ (आदेश) काढतो, त्याचप्रमाणे संघ हिंदु धर्म लादू इच्छितो. (हिंदु धर्माला तालिबानशी जोडणार्‍यांचे डोके पडताळण्याचीच आवश्यकता आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • तोंड आहे म्हणून सनातनद्वेषाची गरळओक करणारे सिद्धरामय्या ! ‘मुलांवर विद्वेषाचा संस्कार करणारे शासनकर्ते’, अशीच सिद्धरामय्या यांची ओळख जनता ठेवेल !
  • सनातनवाद्यांची संगत नको म्हणणारे सनातन धर्माच्या मंदिरांचे सरकारीकरण करून त्याच्या पैशांचा वापर कसे करतात ? ते त्यांना कसे चालते ?
  • काँग्रेसने मुस्लीम लीगशी, मुल्ला-मौलवींशी, काश्मीरमधील आतंकवाद्यांशी संबंध ठेवलेले चालतात; मात्र राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करणार्‍याशी संबंध ठेवू नका, असे सांगणारे कोणत्या मानसिकतेचे आहेत, हे लक्षात येते !