
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या नौदलाने नुकतीच तलाईमन्नार भागात ४७ भारतीय मासेमारांना अटक करून त्यांच्या ५ नौका जप्त केल्या. भारतीय मासेमारांवर श्रीलंकेच्या समुद्री सीमेच्या आत अवैध मासेमारी केल्याचा आरोप आहे. (श्रीलंका असा आरोप करत रहाणार आणि भारत ते स्वीकारत रहाणार आहे का ? भारतीय मासेमारांसाठी भारतीय समुद्री सीमा लक्षात येण्यासाठी सरकार उपाय का काढत नाही ?- संपादक)
१. श्रीलंकेच्या नौदलाचे प्रवक्ते कमांडर बुद्धिका संपथ यांनी सांगितले की, पकडलेले मासेमार आणि जप्त केलेल्या नौका उत्तरेकडील मत्स्य विभागाच्या अधिकार्यांकडे सोपवण्यात येतील.
२. भारत आणि श्रीलंका यांच्यात मासेमारांचा प्रश्न अनेक वर्षांपासून आहे. श्रीलंकेच्या नौदलाने अनेकदा भारतीय मासेमारांवर गोळीबार केला आहे. मागील महिन्यात जाफनाजवळ १२ भारतीय मासेमारांना अटक करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकाआणखी किती वर्षे हे असे चालणार आहे ? सध्या भारताच्या मेहरबानीवर जगणार्या श्रीलंकेवर भारत कोणताही दबाव निर्माण करत नसेल, तर अशा नीतीचा उपयोग काय ? |
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत