६० लाख हेक्टरवर हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज !

मुंबई – ३० सप्टेंबर या दिवशी मंत्रीमंडळ बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. दिवाळीपूर्वी शेतकर्यांना साहाय्य करण्याचा प्रयत्न राहील. ‘ओला दुष्काळ’ घोषित करायचा अर्थ असतो की, त्या सवलती लागू करा. ‘ओला दुष्काळ’ ही संकल्पनाच नाही, तरीही तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रीमंडळाने घेतलेला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले.
राज्यात गेल्या १५ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकर्यांची अतोनात हानी झाली आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात शेतकर्यांची पिके पाण्यात गेली आहेत.
फडणवीस या वेळी म्हणाले की, ६० लाख हेक्टरवर हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात आपण २ सहस्र ११५ कोटी रुपये शेतकर्यांना वितरित करण्याची कामे चालू केली आहेत. काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारे आढावा घेता येत नव्हता; म्हणून त्यांना अधिक वेळ दिला आहे. भूमी, विहिरी, घरे यांच्या संदर्भातील तातडीचे साहाय्य चालू केले आहे. हानीविषयी साहाय्य करण्याविषयीची धोरणे आम्ही लवकरच घोषित करत आहोत.
राज्याची ‘जीसीसी पॉलिसी’ (ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर) निश्चित करण्यात आली आहे. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल. पुढील काळात जगातून देशात ५ सहस्र ‘जीसीसी’ येणार आहेत. त्यांना महाराष्ट्राकडे वळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अशा प्रकारे धोरण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !