
बेंगळुरू (कर्नाटक) – ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढा देऊन कारावास भोगलेल्या राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारे मानधन राज्य सरकारने अनेक महिन्यांपासून थकवले आहे. या थकलेल्या रकमेने ४ कोटी ८५ लाख रुपयांचा आकडा पार केला आहे. राज्यातील १५० स्वातंत्र्यसैनिकांना प्रतिमास १० सहस्र रुपये मानधन मिळते. सरकारने अनेक महिन्यांपासून हे मानधन दिले नाही. याविषयी स्वातंत्र्यसैनिकांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे.
या संदर्भात महसूलमंत्री कृष्णा बायरेगौडा म्हणाले, ‘‘राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील स्वातंत्र्यसैनिकांचे मासिक मानधन थकले असल्याचा विषय माझ्या निदर्शनास आला आहे. हे मानधन टप्प्याटप्प्याने दिले जाईल. (वास्तविक मानधन का थकवण्यात आले, याची माहिती काँग्रेस सरकार देणार का ? – संपादक)
संपादकीय भूमिकाकाँग्रेसवाल्यांनीच स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता, असे वारंवार सांगून टेंभा मिरवणारे काँग्रेसवाले आज स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान निधी थकवत आहेत. यावरून काँग्रेसवाल्यांच्या देशभक्तीवर कुणी प्रश्न उपस्थित केला, तर त्यात चुकीचे ते काय ? |
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court