
बेंगळुरू (कर्नाटक) – ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढा देऊन कारावास भोगलेल्या राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारे मानधन राज्य सरकारने अनेक महिन्यांपासून थकवले आहे. या थकलेल्या रकमेने ४ कोटी ८५ लाख रुपयांचा आकडा पार केला आहे. राज्यातील १५० स्वातंत्र्यसैनिकांना प्रतिमास १० सहस्र रुपये मानधन मिळते. सरकारने अनेक महिन्यांपासून हे मानधन दिले नाही. याविषयी स्वातंत्र्यसैनिकांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे.
या संदर्भात महसूलमंत्री कृष्णा बायरेगौडा म्हणाले, ‘‘राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील स्वातंत्र्यसैनिकांचे मासिक मानधन थकले असल्याचा विषय माझ्या निदर्शनास आला आहे. हे मानधन टप्प्याटप्प्याने दिले जाईल. (वास्तविक मानधन का थकवण्यात आले, याची माहिती काँग्रेस सरकार देणार का ? – संपादक)
संपादकीय भूमिकाकाँग्रेसवाल्यांनीच स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता, असे वारंवार सांगून टेंभा मिरवणारे काँग्रेसवाले आज स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान निधी थकवत आहेत. यावरून काँग्रेसवाल्यांच्या देशभक्तीवर कुणी प्रश्न उपस्थित केला, तर त्यात चुकीचे ते काय ? |
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
नाशिकमध्ये पहिल्याच पावसात खोदलेल्या रस्त्यांवर चिखल !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !