‘हलाल जिहाद’ हे आर्थिक स्तरावरील युद्ध !

श्री. रमेश शिंदे

अर्थसंपन्न व्यक्तीच राज्यव्यवस्थेत प्रभावशाली मानली जाते, तसेच अर्थसंपन्नतेमुळेच अमेरिका, इंग्लंड आदी देश पुढारलेले म्हणवले जातात ! म्हणूनच अर्थकारण महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत जगाचा विनाश करू पहाणार्‍या जिहाद्यांच्या हातात जर ही अर्थव्यवस्था गेली, तर…? यासाठी हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करणे आवश्यक आहे. हलाल जिहाद हे आर्थिक स्तरावरील  युद्धच आहे. त्यामुळे या ‘आर्थिक जिहाद’चा प्रतिकार करणे आवश्यक आहे. केवळ ‘हलालमुक्त गणेशोत्सव’ नाही, तर ‘हलालमुक्त भारत’ होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे, आवश्यक आहे.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.