पथ्याचे महत्त्व !

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

एखाद्या जागी जेव्हा काही लोक कचरा टाकायला प्रारंभ करतात, त्या जागी हळूहळू नवीन लोकही कचरा टाकतात आणि कचरा साठायला लागतो. जेव्हा आपण ती जागा स्वच्छ करायला घेतो, तेव्हा नवीन कचरा तिथे लगेच टाकला जाऊ नये, याची दक्षता घेतो, म्हणजेच एक गोष्ट स्वच्छ करतांना तीच गोष्ट तिथे पुन्हा पुन्हा होऊ नये, याची काळजी घेतो. नाही तर या दुष्टचक्रात पूर्ण जागा कधीच स्वच्छ होणार नाही.

औषधांच्या साहाय्याने रोग न्यून करतांना शरिरात हेच पथ्याचे काम असते. औषधांनी आजार पूर्ण बरा होईपर्यंत तो वाढू नये, आपल्याकडून दक्षता घेतली की, आजार पूर्ण बरा व्हायला साहाय्य होते आणि नंतर थोडेफार अपथ्य सहन करायला शरीर सक्षमही होते.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.