
कोल्हापूर, २२ ऑगस्ट (वार्ता.) – कोल्हापूर शहरात अनेक रस्ते खड्डेमय आणि धोकादायक झाले आहेत, तरी याच्या निषेधार्थ अखिल भारत हिंदु महासभा पक्ष यांच्या वतीने खड्डे असलेल्या रस्त्यांमध्ये झाडे लावून खड्ड्यांच्या आजूबाजूला रांगोळी काढून, तसेच फुले टाकून वेगळ्याप्रकारे आंदोलन करण्यात आले. खड्ड्यांमुळे नागरिकांचे अपघात, नागरिकांचे मृत्यू होत आहेत, आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत, तरी संबंधित ठेकेदार आणि उत्तरदायी अधिकारी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली.

या प्रसंगी राजेंद्र तोरस्कर, विकास जाधव, नंदू घोरपडे, अजय सोनवणे, महिंद्र अहिरे, बबन खोपकर, सुनील सामंत, मनोहर सोरप, गजानन तोडकर, अभिजित पाटील, महिला आघाडीच्या शिलाताई माने, रेश्मा साळुंखे, डॉ. अश्विनी माळकर यांसह अन्य उपस्थित होते.
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !