
वर्धा – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दाेष मुक्त केल्यानंतरही काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वृत्तवाहिन्यांवर ‘भगवा आतंकवाद म्हणू नका, तर सनातनी आतंकवाद म्हणा किंवा हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणा’, अशी अत्यंत धार्मिक द्वेष पसरवणारी विधाने करून समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे चव्हाण यांच्या विधानाची सखोल चौकशी करावी, तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे नोंदवावेत, अशी मागणीही या वेळी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
राष्ट्रध्वजाचा अवमानरोखा ! – हिंदु जनजागृती समिती१५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणाच्या दिवशी मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकवला जातो; पण काही वेळाने रस्त्यावर आणि कचर्यात अनेक कागदी अन् प्लास्टिकचे राष्ट्रध्वज पडलेले आढळतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाची ही विटंबना थांबवण्यासाठी कार्यवाही करावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले. |
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !