
भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांचा कार्यकाळ हा १६ वर्षे १० मास इतका मानला जातो; पण यात एक मेख आहे. ती म्हणजे नेहरू हे १५ ऑगस्ट १९४७ पासून १७ एप्रिल १९५२ पर्यंत निवडून आलेले पंतप्रधान नव्हते, तर ते गांधींनी निवडलेले आणि भारतियांच्या डोक्यावर बसवलेले पंतप्रधान होते. भारताची लोकसभेची पहिली निवडणूक १७ एप्रिल १९५२ या दिवशी झाली आणि १५ मे १९५२ या दिवशी लोकसभेचे पहिले अधिवेशन चालू झाले. यावरून नेहरूंचा खरा कार्यकाळ तेव्हापासून चालू होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे नेहरू आणि पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळाची तुलना करणे अयोग्य आहे. ती केवळ इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाशी होऊ शकते; कारण या दोघांनी निवडणुका लढवून यश मिळवले आहे. नेहरूंनी वर्ष १९५२, वर्ष १९५७ आणि वर्ष १९६२ या सलग ३ निवडणुका जिंकल्या, तर पंतप्रधान मोदी यांनीही वर्ष २०१४, वर्ष २०१९ अन् वर्ष २०२४ अशा सलग ३ निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे भारतियांनी ‘नेहरू सर्वाधिक काळ पंतप्रधान होते’, या भ्रमातून बाहेर यावे.
– श्रीमती कमलिनी कुंडले, देवद, पनवेल. (३०.७.२०२५)
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !