रात्री उशिरापर्यंत भ्रमणभाष पाहिल्यामुळे होणारे दुष्परिणाम !

१. रात्रीची झोप पूर्ण न झाल्यामुळे होणारे परिणाम

अंधारात भ्रमणभाष पाहिल्याने डोळ्यांवर होणारे परिणाम

‘काही लोक रात्री बराच वेळ भ्रमणभाष पहातात. रात्रीची झोप पूर्ण न झाल्याने शरिरात पित्त निर्माण होते. पित्ताने शरिरात उष्णता निर्माण होऊन केस गळणे, पोट साफ न होणे, वायू होणे आदी त्रास होतात. आपली झोप पूर्ण न झाल्यामुळे दुसर्‍या दिवशी कामात लक्ष लागत नाही, तसेच चिडचिडेपणा वाढतो.

२. अंधारात भ्रमणभाष पाहिल्याने डोळ्यांवर होणारे परिणाम

डॉ. दीपक जोशी

अंधारात भ्रमणभाष पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो आणि डोळ्यांतून पाणी येते, तसेच उपनेत्र (चष्मा) लागणे किंवा चष्म्याचा क्रमांक वाढणे इत्यादी त्रास होऊ शकतात.

३. हात आणि खांदा यांवर होणारे परिणाम

रात्री भ्रमणभाष बराच वेळ हातात धरून पाहिल्याने हात आणि खांदा यांवर ताण येऊन सूज येते अन् दुखणे चालू होते.’

– डॉ. दीपक जोशी (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स) देवद, पनवेल. (१८.२.२०२५)