|

नवी देहली – मराठी भाषेमध्येही इतर भाषांप्रमाणेच संकल्पना आहेत. त्यामध्ये वेगळेपणा आहे. मोगलांना विरोध करणारे साम्राज्य ‘मराठा साम्राज्य’ होते. त्यामुळे इतिहासाचा हा भाग समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे मत जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (‘जेएनयू’च्या) कुलगुरु प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी मांडले. महाराष्ट्रात चालू असलेल्या हिंदी-मराठी भाषांवरील वादावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना त्या बोलत होत्या. मराठी भाषेविषयी बोलतांना त्या म्हणाल्या, ‘मी प्रथम मातृभाषेला प्राधान्य देईन; कारण मातृभाषा ही सर्वांत महत्त्वाची आहे. इतर २ भाषा तुमच्या व्यवहारातील भाषा असायला हव्यात.’
#WATCH | Delhi | On Marathi language row, Jawaharlal Nehru University (JNU) Vice-Chancellor Prof Santishree Dhulipudi Pandit says, "I would go with mother tongue first because mother tongue is the most important. The other two languages should be your market language. Wherever… pic.twitter.com/8fCcNRl1UL
— ANI (@ANI) July 22, 2025
कुलगुरु प्रा. शांतिश्री पुढे म्हणाल्या की,
१. तुम्ही कुठेही रहा, स्थानिक भाषा आणि तुमच्या व्यवसायाची (करिअरची) भाषा शिका. हा नागरिकांचा वैयक्तिक निर्णय असायला पाहिजे.
२. भारतातील सर्वच भाषा चांगल्या आहेत. बहुभाषिकतेमध्ये संख्या महत्त्वाची नाही. भाषा द्वेष किंवा श्रेष्ठता यांचे साधन असू नये. ती संवादाची भाषा असली पाहिजे.
३. मी सर्वांना भारतातील प्रत्येक भाषा शिकण्यास प्रोत्साहित करते, जिथे इतके विशाल साहित्य आणि संपत्ती आहे. जरी भारतीय साहित्य वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिले गेले असले, तरी आपण एक आहोत.
Odisha Vigilance Arrests Engineer : ओडिशात अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त
LPG Price Hike : घरगुती सिलिंडर २९ रुपयांनी महागला
Goalpara School Beef Row : आसाममधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस भरवण्याचा प्रयत्न
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा