
आणीबाणीच्या काळ्या, कठोर काळामध्ये ‘पुन्हा लोकशाही आणि विचारस्वातंत्र्य कधीच परत मिळणार नाही’, अशी पोलादी पाशवी शक्ती इंदिरा गांधी आणि काँग्रेस यांची होती. सरकारविरुद्ध बोलणे-लिहिणे गुन्हा होता. आम्ही सहस्रो कार्यकर्ते कारागृहात डांबले गेलो. राजकीय पक्ष, वृत्तपत्रे, विचारवंत, व्यापारी हे सर्व इंदिरा गांधींना शरण जात होते. ‘अनुशासन पर्व’ म्हणून आणीबाणीचा गौरव करत इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीची तळी अन्य काही पक्ष आणि विनोबा भावे हेही उचलत होते. अभिव्यक्तीस्वातंत्र्य संपले होते. अशी परिस्थिती असूनही मला एक दुर्दम्य विश्वास होता की, यातून प्रकाशाचा… लोकशाहीचा… अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुन्हा उदय होऊन आपण मोकळा श्वास घेऊ.

वयाच्या २० व्या वर्षी मी एक कविता लिहून मी आणीबाणीप्रणित दडपशाहीचा प्रतिकात्मक काव्यरूप निषेध केला. माझ्या ‘जे.जे.कॉलेज’च्या वर्ष १९७६ च्या ‘मराठी वाङ्मय मंडळा’चा मी सचिव म्हणून संपादित केलेल्या विशेषांकात ती कविता छापली होती. महाविद्यालयाच्या सूचनाफलकवरही लावली होती. कवी हा पहिला द्रष्टा क्रांतीकारी असतो. तो जे उदात्त स्वप्न पहातो, ते साकारते. पुढील काळात त्याची प्रचीती लवकरच आली. रा.स्व. संघ परिवाराच्या नेतृत्वाखाली मोठे जनआंदोलन होऊन इंदिरा गांधी यांचा राजकीय आणि नैतिक पराभव सामान्य जनतेने मतपेटीद्वारे केला. हा इतिहास आम्ही वर्ष १९७७ मध्ये लगेच पाहिला. निशांत झाला. लोकशाही पुन्हा तेजाने तळपू लागली. देश आणि राज्यघटना यांचे रक्षण झाले. या घटनेला २५ जून २०२५ या दिवशी ५० वर्षे झाली. त्यानिमित्त पुन्हा त्या काळया कायद्याचा निषेध करतो आणि देशासाठी जनजागरण करण्याचा नवा संकल्प करतो.
‘सत्यमेव जयते । भारत चिरायु होवो ।’
– श्री. विवेक प्र. सिन्नरकर, वास्तूविशारद आणि ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ लेखक, कोथरूड, पुणे.
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !