राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे नोंद !

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन केल्याचे प्रकरण

कोल्हापूर – १ जुलैला शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करत ‘पुणे-बेंगळुरू’ राष्ट्रीय महामार्ग २ घंटे रोखल्याच्या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह ४०० जणांवर शिरोली औद्योगिक वसाहत येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘रस्ता बंद आंदोलन करू नये’, अशी नोटीस या सर्वांना बजावण्यात आली होती. असे असतांना बंदीचा आदेश धुडाकावून लावून ‘रस्ता बंद’ आंदोलन केल्याच्या प्रकरणी हे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.