सकल हिंदु समाजाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

कोल्हापूर, २५ जून – हिंदु समाजाची अस्मिता, सुरक्षा आणि धार्मिक स्वातंत्र्य यांना धोका निर्माण करणार्या गंभीर विषयांवर तात्काळ कार्यवाही व्हावी; अन्यथा १० दिवसांनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. या प्रसंगी हिंदु एकता आंदोलन, हिंदु महासभा, हिंदु जनजागृती समिती, मंदिर महासंघ, विश्व हिंदु परिषद, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, अखिल भारत हिंदु महासभा, महाराजा प्रतिष्ठान, ‘शिवशाही फाऊंडेशन’ यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनातील काही मागण्या
१. मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवा
२. शिवभक्तांवरील खोटे गुन्हे मागे घ्या
३. हिंदु धर्म, देवता, महापुरुष यांचावरील अपमानास्पद वक्तव्ये करणार्यांवर कारवाई करा
४. बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी थांबवा
५. शाळांमध्ये संस्कारवर्ग लागू करा
६. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या
(बहुसंख्य हिंदूबहुल देशात अशा मागण्या कराव्यात लागतात आणि त्यासाठी आमरण उपोषणाची चेतावणी द्यावी लागते, हे दुर्दैवी आहे ! – संपादक)
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
मोकाट कुत्र्यांना आवरा !
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !