राष्ट्र म्हणजे काय ?

नुसते दगड धोंडे किंवा नुसती माणसे हे काही राष्ट्र होऊ शकत नाही. ‘हे दगड धोंडे, ही भूमी, संस्कृती, हा इतिहास ‘माझा आहे,’ असे स्वाभिमानपूर्वक ज्या समाजाला वाटते, तो राष्ट्र कल्पनेच्या परिसरात आला’, असे म्हणावयास प्रत्यवाय नाही. संस्कृतीच्या आणि भूमीच्या रक्षणवर्धनासाठी प्रसंगी त्यागाची सिद्धता ठेवणारा संघटित अन् जागरूक समाज, म्हणजे खरे राष्ट्र ! समाजातील घटकांत ही जाणीव निर्माण करणे, हे पहिले काम. ती दृष्टी निर्माण झाल्यानंतर कठीण वाटणारे सामाजिक, धार्मिक अन् राजकीय प्रश्न आपोआप सुटतात.

(साभार : ग्रंथ ‘अज्ञाताची वचने’, संचालक : श्री. अमरेंद्र गाडगीळ)