
पुणे, ७ जून (वार्ता.) – ज्या नदीचे जल वारकरी तीर्थ म्हणून प्राशन करतात, अनेक संतांचे अभंग जिच्या उल्लेखाविना पूर्ण होत नाहीत, अशा इंद्रायणी नदीमध्ये गटारांचे प्रदूषित पाणी सोडले जात आहे. इंद्रायणी नदी पुढे आळंदी आणि-देहू या तीर्थक्षेत्रात जाते, अशा या पवित्र नदीमध्ये आळंदी-देहू मार्गावरील कुदळवाडी-चिखली चौक येथे कारखान्यांतील रसायनयुक्त आणि घरांमधील सांडपाणीमिश्रीत मैला थेट सोडला जात आहे. याकडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे.
कुदळवाडी-चिखली येथून येणार्या गटारावरील जलशुद्धी प्रकल्पाची क्षमता अल्प आहे. मोठ्या क्षमतेचा प्रकल्प बसवण्याची मागणी होत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत; मात्र कार्यवाही झालेली नाही. आषाढी-एकादशी वारी तोंडावर आली असतांनाही नदीपात्रात सोडल्या जाणार्या दूषित पाण्यावरील प्रक्रियेची कार्यवाही अपूर्णच आहे.
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
आरोपीवर दोषारोप निश्चित !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !