
पुणे, ७ जून (वार्ता.) – ज्या नदीचे जल वारकरी तीर्थ म्हणून प्राशन करतात, अनेक संतांचे अभंग जिच्या उल्लेखाविना पूर्ण होत नाहीत, अशा इंद्रायणी नदीमध्ये गटारांचे प्रदूषित पाणी सोडले जात आहे. इंद्रायणी नदी पुढे आळंदी आणि-देहू या तीर्थक्षेत्रात जाते, अशा या पवित्र नदीमध्ये आळंदी-देहू मार्गावरील कुदळवाडी-चिखली चौक येथे कारखान्यांतील रसायनयुक्त आणि घरांमधील सांडपाणीमिश्रीत मैला थेट सोडला जात आहे. याकडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे.
कुदळवाडी-चिखली येथून येणार्या गटारावरील जलशुद्धी प्रकल्पाची क्षमता अल्प आहे. मोठ्या क्षमतेचा प्रकल्प बसवण्याची मागणी होत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत; मात्र कार्यवाही झालेली नाही. आषाढी-एकादशी वारी तोंडावर आली असतांनाही नदीपात्रात सोडल्या जाणार्या दूषित पाण्यावरील प्रक्रियेची कार्यवाही अपूर्णच आहे.
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी प्रस्थान !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले