महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा जातीद्वेष !

मुंबई – समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते, असा खोटा इतिहास उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगत आहेत. समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते; परंतु याविषयी जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे, असे ज्ञान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ६ जून या दिवशी गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत पाजळले.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात सर्वच जाती आणि धर्म यांच्या लोकांना समान स्थान होते. (‘खोटे बोला; पण रेटून बोला’ या वृत्तीचे काँग्रेसवाले ! – संपादक) सर्वधर्मसमभावाची हीच संकल्पना राज्यघटनेत आहे. शिवाजी महाराजांना ‘जाणता राजा’ म्हटले जाते; परंतु महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणार्या दुष्ट प्रवृत्तींचा सध्या महाराष्ट्रात नंगानाच चालू आहे. भाजपचे सरकार असतानांच या प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. या प्रवृत्तींचा कडलोट करा. (जातीद्वेषी काँग्रेसचा कडेलोट व्हायची वेळ आली असूनही जातीयवादी विधान करत सुटलेले काँग्रेसवाले ! – संपादक)
संपादकीय भूमिकासमर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील पत्रव्यवहाराचे पुरावे आजही उपलब्ध आहेत आणि नवीन पुरावे नुकतेच कर्नाटकातही सापडले आहेत. हिंदूंना आतंकवादी ठरण्यासाठी षड्यंत्र रचणार्या काँग्रेसनेच छत्रपती शिवरायांच्या गुरूंविषयी बोलणे हाच मोठा विनोद होय ! |
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा ! – विश्व हिंदू परिषद
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !