पाण्याच्या संकटातून लवकर बाहेर पडलो नाही, तर उपासमारीने मरू ! – Pakistani MP Syed Ali Zafar

पाकिस्तानचे खासदार सय्यद अली जफर यांची पाकच्या संसदेत सरकारला विनवणी !

पाकिस्तानचे खासदार सय्यद अली जफर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर आपण आताच पाणी संकट सोडवले नाही, तर आपण उपासमारीने मरू शकतो. हा ‘वॉटर बाँब’ (पाण्याचा बाँब) आहे; कारण सिंधु खोरे ही आपली जीवनरेखा (लाइफ लाइन) आहे.

https://twitter.com/SanatanPrabhat/status/1926325117157519677

आपल्या देशात तीन चतुर्थांश पाणी देशाबाहेरून येते. आपल्यातील प्रत्येक १० पैकी ९ लोक या नदीवर अवलंबून आहेत. आपल्या ९० टक्के पिकांना या नदीतून पाणी मिळते. या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी सरकारने काही पावले उचलावीत, अशी मागणी पाकिस्तानचे खासदार सय्यद अली जफर यांनी सिंधु जल वाटप करार भारताने स्थगित केल्यावरून पाकच्या संसदेत केली. अली जफर माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’  पक्षाचे खासदार आहेत.