संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकिस्तानला पुन्हा फटकारले !

न्यूयॉर्क (अमेरिका) – नागरिक आणि आतंकवादी यांच्यामध्ये जो देश भेद करत नाही, त्याला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाकला फटकारले. संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी काश्मीरचे सूत्र उपस्थित केले होते. तसेच भारत आणि पाक यांच्यात नुकताच झालेल्या संघर्षाबद्दल वक्तव्य केले होते. त्यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर दिले.
India schools Pakistan at the UN—again! 🇮🇳🔥
🇵🇰 has no right to talk about citizens’ safety. This shameless, rogue state remains unmoved by words.
Only the language of force can shake its foundation and hasten its downfall#IndiaAtUN #PakistanExposed pic.twitter.com/cRJFmRjRxO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 24, 2025
संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वथानेनी हरीश यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतातील सीमावर्ती गावांवर गोळीबार केला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला. तसेच भारतातील धार्मिक स्थळांना जाणूनबुजून लक्ष्य केले. पाकिस्तानच्या भारतातील आतापर्यंतच्या आतंकवादी कारवायांमध्ये सर्वसामान्य नागरिक लक्ष्य ठरले; कारण पाकचा उद्देश आमची समृद्धी, प्रगती यांवर आक्रमण करणे आहे. पाकिस्तान आतंकवाद्यांचा बचाव करण्यासाठी वारंवार सर्वसामान्य नागरिकांचा ढालीसारखा वापर करत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या अंतिम संस्कारमध्ये पाकिस्तान सैन्यातील अधिकारी, पोलीस आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी सहभागी झाले होते, त्याचा व्हिडिओ सर्व जगाने पाहिला आहे.
संपादकीय भूमिकागेंड्याच्या कातडीच्या पाकला शब्दांचा कितीही मार दिला, तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. अशा कोडग्या पाकला शस्त्रांच्याच भाषेत कठोर उत्तर देत रहाणे आवश्यक आहे. यातूनच त्याचा नाश केला पाहिजे ! |
भारतातील घटत्या प्रजनन प्रमाणावर इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप