ब्रह्मांडव्यापक कार्य करणाऱ्या ॠषींचे सनातन संस्थेला मार्गदर्शन !

‘विश्वाच्या निर्मितीपासून ब्रह्मांडाचा समतोल राखणे आणि पृथ्वीवर धर्म टिकवून ठेवणे, ही दोन महत्कार्ये ऋषी करत आहेत. या कार्याची व्यापकता पहाता, एकूण ब्रह्मांड-व्यवस्थेत ॠषींचे कार्य अलौकिक आहे, हे लक्षात येते. असे ब्रह्मांडव्यापक कार्य करणारे ॠषी सध्याच्या काळात पृथ्वीवरील छोट्याशा सनातन संस्थेला नाडीपट्ट्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. आमच्यासाठी यापेक्षा मोठे भाग्य कोणतेच असू शकत नाही. आज सनातन संस्थेच्या पाठी ॠषीगणही उभे आहेत. अशा सर्व ॠषींच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले