भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांवर कठोर सैन्य कारवाई करावी !

  • हिंदु राष्ट्र समन्वय समितीची अकोला जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी !

  • अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा विशेष सहभाग !

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना धर्माभिमानी

अकोला, २८ एप्रिल (वार्ता.) – भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांसह त्यांच्या भारतातील हस्तकांवर कठोर सैन्य कारवाई करावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने श्री. श्याम धनमने, अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांना निवेदनाद्वारे देण्यात आली. या वेळी राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीचे अधिवक्ता मिलिंद लहरिया, अधिवक्त्या मंजू सावरकर, अधिवक्त्या संगीता गावंडे, अधिवक्त्या श्रुती भट, अधिवक्ता पप्पू मोरवाल, अधिवक्ता अमर तिवारी, अधिवक्ता राहुल चुटके, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक श्री. उदय जी महा, श्री. योगेश अग्रवाल, श्री. संजय ठाकूर, श्री. श्रीराम पांडे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य श्री. प्रमोद अग्निहोत्री, श्री. राजीव इंगळे, श्री. दीपक पुरी, स्वराज्य फाउंडेशनचे श्री. रवींद्र फाटे, हिंदु जनजागृती समितीच्या अश्विनी सरोदे, श्री. राजेश क्षीरसागर इत्यादी उपस्थित होते.