महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने हस्ताक्षराशी संबंधित केलेल्या चाचण्या आणि त्याविषयी केलेले अद्वितीय संशोधन

‘व्यक्तीची स्पंदने तिच्या हस्ताक्षरातून प्रक्षेपित होतात. व्यक्तीच्या हस्ताक्षरातील स्पंदने मूलतः व्यक्तीची आध्यात्मिक पातळी, तिला आध्यात्मिक त्रास असणे किंवा नसणे इत्यादी विविध घटकांवर अवलंबून असतात. व्यक्तीने केलेल्या लिखाणाचा विषय, भाषा, अक्षर इत्यादींनुसार तिच्या हस्ताक्षरातील स्पंदने पालटतात. एखाद्याचे हस्ताक्षर सुवाच्च किंवा दिसायला सुंदर असले, तरी ते सात्त्विक असेलच असे नाही. याउलट संतांचे हस्ताक्षर नीटनेटके नसले, तरी त्यातून चैतन्य प्रक्षेपित होते. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले अन् नसलेले विविध आध्यात्मिक पातळीचे साधक-साधिका आणि संत यांच्या हस्ताक्षरांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधनात्मक प्रयोग करण्यात आला.
या प्रयोगात ४ साधक-साधिका आणि ३ संत यांना कोर्या कागदावर उभ्या अन् आडव्या ५-५ रेघा (पट्टी न वापरता), तसेच ५ गोलकार आकृत्या काढण्यास सांगण्यात आले. (यामुळे विषय, भाषा, अक्षर इत्यादींचा त्या सर्वांच्या हस्ताक्षरावर होणारा परिणाम टाळता आला.) या सर्व हस्ताक्षरांच्या (कागदांच्या) लोलकाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. लोलकाने वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते. या चाचण्यांतील नोंदी आणि त्यांचे विवेचन पुढे दिले आहे.

१. चाचण्यांतील ४ साधक-साधिका आणि ३ संत यांच्या हस्ताक्षरांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन
वरील नोंदींतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
१ अ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाच्या हस्ताक्षरात पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळून येणे : या साधकाला वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे. त्यामुळे त्याच्या हस्ताक्षरात पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळून आली. या साधकाची साधना जशी वाढत जाईल, तसा त्याचा त्रास न्यून होईल आणि त्याच्या हस्ताक्षरात ते प्रतिबिंबित होईल.

१ आ. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकेच्या हस्ताक्षरात अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून येणे : या साधिकेवर काही प्रमाणात त्रासदायक स्पंदनांचे आवरण असल्याने तिच्या हस्ताक्षरात अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली. तिच्या साधनेमुळे तिच्यामध्ये सात्त्विकता निर्माण होत आहे. तिच्या हस्ताक्षरात ती प्रतिबिंबित झाली आहे. त्यामुळे तिच्या हस्ताक्षरात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.
१ इ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या ६० टक्क्यांहून अधिक पातळीच्या साधिकेच्या हस्ताक्षरात अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे : या साधिकेला वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे. तिची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक आहे. तिच्या साधनेमुळे तिच्यातील त्रासदायक स्पंदने न्यून होऊन तिच्यात सात्त्विकता निर्माण झाली आहे. तिची साधना आणखी वाढत जाईल आणि तिचा त्रास पूर्णतः नाहीसा होईल, तेव्हा तिच्या हस्ताक्षरात ते प्रतिबिंबित होईल.
१ ई. आध्यात्मिक त्रास नसलेल्या ६० टक्क्यांहून अधिक पातळीच्या साधिकेच्या हस्ताक्षरात चैतन्य असणे : या साधिकेच्या हस्ताक्षरात नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. अन्य साधक-साधिकांच्या तुलनेत तिच्या हस्ताक्षरात सकारात्मक ऊर्जा अधिक आहे. तिची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक आहे. तसेच तिला आध्यात्मिक त्रास नाही. तिच्यात चैतन्य निर्माण झाले आहे. तिच्या हस्ताक्षरातून ते प्रक्षेपित होत आहे. तिची साधना वृद्धींगत होईल, तसे तिच्यातील चैतन्याचे प्रमाण वाढेल.

१ उ. पू. वामन राजंदेकर, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ताक्षरांत उत्तरोत्तर अधिक प्रमाणात चैतन्य असणे : पू. वामन राजंदेकर, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ताक्षरांत नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. त्यांच्या हस्ताक्षरांत उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे. तीनही संतांच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्यांच्यामध्ये चैतन्याचे प्रमाण उत्तरोत्तर अधिक आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे अत्युच्च पातळीचे समष्टी संत आहेत. त्यांच्या हस्ताक्षरातून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे.
थोडक्यात व्यक्तीची स्पंदने तिच्या हस्ताक्षरातून प्रक्षेपित होतात. व्यक्तीच्या हस्ताक्षरातील स्पंदने मूलतः तिची आध्यात्मिक पातळी, तिला आध्यात्मिक त्रास असणे किंवा नसणे इत्यादी विविध घटकांवर अवलंबून असतात, हेच या संशोधनातून दिसून आले.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.१.२०२५)
ई-मेल : [email protected]
‘साधनेमुळे स्वतःतील स्पंदने पालटून चैतन्य वाढते’, हे लक्षात घेऊन साधना करा !

‘सर्वसाधारण व्यक्ती साधना करत नाही. तिच्यामध्ये रज-तमोगुणाचे प्राबल्य असल्याने तिच्याकडून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. याउलट साधना करणार्या व्यक्तीमध्ये तिच्या साधनेमुळे रज-तमोगुण घटून तिच्यातील सत्त्वगुण वाढतो. व्यक्तीची साधना जसजशी वाढत जाते, तसतशी तिच्यातील सात्त्विकताही वाढत जाते. साधनेमुळे तिच्यामध्ये चैतन्य निर्माण होण्याची प्रक्रिया आरंभ होते. यामुळे तिचा देह, तिच्या वापरातील वस्तू हेही चैतन्याने भारित होतात. एवढेच नव्हे, तर तिचे छायाचित्र, हस्ताक्षर आणि अगदी तिचे केस अन् नखे यांमधूनही चैतन्य प्रक्षेपित होऊ लागते. तिच्यातील चैतन्याचा सकारात्मक परिणाम तिची वास्तू, तिचे कुटुंबीय, तसेच तिच्या सहवासात येणारे लोक यांच्यावरही होऊ लागतो. थोडक्यात साधनेमुळे व्यक्तीतील स्पंदने पालटून तिच्यातील चैतन्य वाढते. साधनेचे हे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन आजच साधना करण्यास आरंभ करा !’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.१.२०२५)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |