प्रदूषणामुळे इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली !

आळंदी (जिल्हा पुणे), ४ एप्रिल (वार्ता.) – वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी प्रदूषणामुळे पुन्हा एकदा फेसाळली आहे. पिंपरी-चिंचवडमधील अवैधरित्या चालणारी आस्थापने इंद्रायणीत रसायनयुक्त पाणी सोडतात. इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी आतापर्यंत २ वेळा साखळी उपोषण एकदा लाक्षणिक उपोषण, सायकल रॅली, आंदोलन, जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयात बैठका, अनेक नेत्यांना निवेदने या सर्व गोष्टी करूनही २ दशके झाली, तरीही इंद्रायणी नदीचे प्रदूषण मात्र आहे तसेच आहे, असे आळंदी येथील ‘इंद्रायणी सेवा फाऊंडेशन’ने सांगितले. गेल्या वर्षभरात तेलकट तवंग, पांढर्या रंगाचा फेस नदीत दिसत आहे; मात्र त्याचा काहीही फरक कारखाने, सांडपाणी सोडणार्या यंत्रणांवर पडलेला नाही. या प्रदूषणाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पिंपरी-चिंचवड पालिका यासाठी सर्वस्वी उत्तरदायी आहे.
संपादकीय भूमिकामहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कधी जाग येणार ? आतातरी प्रशासन नदी प्रदूषण कायमस्वरूपी थांबवण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना राबवणार का ? |