
मुंबई – येथे ३ जून या दिवशी पडलेल्या पहिल्याच पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली, बोरीवली, वांद्रे, घाटकोपर, मुलुंड, कुर्ला, मीरा रोड आणि मरीन ड्राइव्ह परिसरात पुष्कळ पाऊस पडला. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने सकाळी ७.४० वाजता तेथील वाहतूक बंद करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कर्मचार्यांनी तातडीने पाणी उपसल्याने ४५ मिनिटांनंतर वाहतूक पूर्ववत झाली.
बर्याच ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याने अनेक प्रवाशांनी सामाजिक माध्यमांवर वाहतूक व्यवस्थापनाविषयी खेद व्यक्त केला. पूर्व द्रुतगती मार्गावर चेंबूर-वडाळा बोगद्याबाहेर पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरून चारचाकी घसून ती कठड्याला धडकली. यामुळे काही काळ वाहतूक संथ झाली.
मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार !
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी