केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची अजब मागणी !
गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मागणी !

भिवंडी – हातभट्टीची दारू प्यायल्याने आजवर सहस्रो लोकांचा मृत्यू झाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड येथे १८ ते १९ जणांचा मृत्यू झाला. कामगार लोक मेहनत करून कुटुंब सांभाळतात. ताणतणावाच्या प्रसंगात ते हातभट्टीची दारू पितात. पोलिसांनी कितीही धाडी घातल्या, तरीही हातभट्ट्या चालूच असतात. एका ठिकाणची हातभट्टी बंद असली, तरी दुसर्या गल्लीमध्ये बाटल्या मिळतात. त्यामुळे ते कधीच बंद होत नाही. यापेक्षा हातभट्ट्या अधिकृत करा, यातून सरकारला महसूल मिळेल, तसेच गोरगरीब नागरिकांचे प्राण वाचतील, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सरकारला उद्देशून केले. ते भिवंडीत एका कार्यक्रमानिमित्त आले असतांना पत्रकारांशी बोलत होते.
Union Minister Ramdas Athawale backs legalising hand-brewed liquor after the Pune hooch tragedy.
He argues that regulation could curb illicit alcohol deaths and boost state revenue.
An NCP leader has also demanded lifting the liquor ban in Gadchiroli.
Prioritising revenue over… pic.twitter.com/fgTM6lJOLd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 3, 2026
‘विषारी दारू कधीपर्यंत पाजता ? गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवा’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केली आहे. दारूबंदी उठवण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (दारूबंदी उठवली गेली, तर ज्या भागांत दारूबंदी लागू केली आहे, तेथील धोरण किंवा तत्त्वे यांना तिलांजली दिल्यासारखे होईल ! – संपादक) ‘मोहाच्या दारूला कायदेशीर करा. आदिवासी संस्कृतीत जन्म, लग्न, मृत्यू अशा वेळेस लोक मोहाची दारू पितात’, असेही ते म्हणाले.
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री