डिसेंबर २०२४ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील संपूर्ण लादीचा गुळगुळीतपणा वाढण्यामागील कार्यकारणभाव !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. खोलीत वाढलेल्या वायुतत्त्वाचा परिणाम लादीवर होणे 

‘व्यक्तीची आध्यात्मिक पातळी आणि आध्यात्मिक त्रास यांनुसार तो रहात असलेल्या वास्तूत सकारात्मक किंवा नकारात्मक वायुतत्त्व कार्यरत असते. ज्या वेळी वास्तूतील वायुतत्त्वाचे (सकारात्मक किंवा नकारात्मक) प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक वाढते, त्या वेळी वायुतत्त्वाचे स्थुलातील प्रमाण खोलीत विविध माध्यमांतून दिसू लागते. वास्तूत रहाणार्‍या व्यक्तीवर आक्रमण करण्यासाठी अनिष्ट शक्तींनी तीव्र त्रासदायक शक्तीयुक्त विषारी वायू सोडला असल्यास लादी भूमीला चिकटून न रहाता वर येणे, लाद्यांना तडा जाणे इत्यादी त्रास आढळतात. याउलट वास्तूत रहाणार्‍या व्यक्तीची साधना चांगली असल्यास क्रियाशक्तीयुक्त वायूमुळे लादी गुळगुळीत होणे, लादीचा उष्ण किंवा थंड स्पर्श अनुभवता येणे, असे पालट अनुभवायला येतात.

श्री. निषाद देशमुख

२. डिसेंबर २०२४ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील संपूर्ण लादीचा गुळगुळीतपणा वाढण्याचे कारण

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले जीवित रहाण्यासाठी त्यांच्या खोलीत प्राणशक्तीयुक्त वायू, तर समष्टी कल्याणासाठी क्रियाशक्तीयुक्त वायू यांचे प्रमाण वाढल्याने खोलीतील संपूर्ण लादीचा गुळगुळीतपणा वाढणे 

काळचक्रामुळे विश्वाच्या तृतीय युद्धाकडे होत असलेल्या वाटचालीमुळे काळाची प्रतिकूलता वाढली आहे. यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना स्थुलदेहात राहून कार्य करण्यासाठी अधिक प्राणशक्ती व्यय करावी लागत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत प्राणशक्तीयुक्त वायु अधिक प्रमाणात कार्यरत झाला आहे.

याच प्रकारे काळाच्या प्रतिकूलतेचा परिणाम साधना करणार्‍या समष्टीवर होऊन विविध प्रकारांच्या आवरणामुळे (मायेचे आवरण, स्वभावदोषांचे आवरण, स्थान आणि प्रारब्ध यांचे आवरण इत्यादी) साधकांची साधना करण्याची क्षमता, म्हणजे क्रियाशक्ती उणावली आहे. समष्टीवरील हे विविध प्रकारचे आवरण नष्ट करण्यासाठी आणि साधनेची खरी तळमळ असलेल्या जिवांना क्रियाशक्ती प्रदान करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत क्रियाशक्तीयुक्त वायू अधिक प्रमाणात कार्यरत झाला आहे.

वरील दोन्ही प्रकारच्या वायूंचे कार्य ‘सगुण शक्ती प्रदान करणे’, असे आहे. यामुळे प्राणशक्तीयुक्त वायू आणि क्रियाशक्तीयुक्त वायू दोन्हींच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे, म्हणजे काळानुसार व्यष्टी आणि समष्टी दोन्ही स्तरांवर सगुण तत्त्वाची आवश्यकता असल्याने खोलीतील संपूर्ण लादीच्या गुळगुळीतपणात (सगुण अनुभूतीत) अधिक वाढ झाली आहे.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा. (१६.१२.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.