केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एअर इंडियाला विचारला प्रश्न !

भोपाळ (मध्यप्रदेश) – भोपाळ ते देहली या प्रवासाच्या एअर इंडियाच्या विमानात खराब सीट मिळाल्यानंतर केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
चौहान यांनी एक्सवर पोस्ट करत याविषयी लिहिले की, मी जाऊन सीटवर बसलो, सीट तुटलेली होती आणि आत खोलवर गेली होती. बसणे वेदनादायक होते. जेव्हा मी कर्मचार्यांना विचारले की, ‘जर सीट खराब असेल तर ती का दिली ?’ त्यांनी सांगितले की, ‘व्यवस्थापनाला आधीच कळवण्यात आले होते की, ही जागा चांगली नाही आणि तिचे तिकीट विकले जाऊ नये.’ अशी एकच जागा नाही, तर अनेक जागा आहेत. माझ्या सहप्रवाशांनी मला माझी सीट बदलून चांगल्या सीटवर बसण्याची विनंती केली; पण मी माझ्यासाठी दुसर्या मित्राला का त्रास देऊ, मी ठरवले की, मी याच सीटवर बसून माझा प्रवास पूर्ण करेन. भविष्यात कोणत्याही प्रवाशाला अशा प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी एअर इंडिया व्यवस्थापन पावले उचलेल का ? कि प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी लवकर पोचण्याच्या असाहायतेचा लाभ घेत राहील ?
आज मुझे भोपाल से दिल्ली आना था, पूसा में किसान मेले का उद्घाटन, कुरुक्षेत्र में प्राकृतिक खेती मिशन की बैठक और चंडीगढ़ में किसान संगठन के माननीय प्रतिनिधियों से चर्चा करनी है।
मैंने एयर इंडिया की फ्लाइट क्रमांक AI436 में टिकिट करवाया था, मुझे सीट क्रमांक 8C आवंटित हुई। मैं जाकर…
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 22, 2025
काँग्रेसकडून केंद्र सरकारवर टीका
युवा काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी पोस्ट करत लिहिले की, शिवराज चौहान यांचे सरकार कुंभमेळ्याला जाणार्या लाखो भाविकांना गाड्यांमध्ये उभे रहाण्यासाठी जागा देऊ शकले नाही; परंतु त्यांना वेदना जाणवल्या नाहीत; परंतु मंत्र्यांना विमानात तुटलेली खुर्ची मिळाल्याचे दुःख जाणवले.
Union Minister Shivraj Singh Chouhan forced to travel on a broken seat in an Air India flight; questions the airline
Airlines continue to deceive and exploit passengers through poor service. This time, a Union Minister experienced it firsthand and spoke out — but what recourse… pic.twitter.com/8itWVWelfy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 22, 2025
संपादकीय भूमिका
|