स्वामी विवेकानंद यांची शिकवण

भारतात आधी येथे आध्यात्मिक विचारांचा पूर वाहू द्या. ज्याकडे आपण प्रथम लक्ष द्यावयास हवे, असे जर कोणते कार्य असेल, तर ते हेच की, आपली उपनिषदे, पुराणे आणि धर्मशास्त्रे यांतच बंदिस्त होऊन पडलेली सर्वाेत्कृष्ट सत्ये आपण ग्रंथांतून, मठांतून, अरण्यांतून आणि विशिष्ट संप्रदायांच्या कह्यातून बाहेर काढली पाहिजेत आणि संपूर्ण देशभर त्यांचा इतका विस्तृत प्रमाणावर प्रचार केला पाहिजे की, ती वणव्याप्रमाणे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि सिंधूपासून ब्रह्मपुत्रेपर्यंत अतीशीघ्र गतीने पसरतील.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?