साम्यवाद्यांनी हिंदूंच्या इतिहासाचे विकृतीकरण करून नास्तिकतावाद पसरवला !

साम्यवाद्यांचा ‘रेड जिहाद’ !

साम्यवाद्यांनी हिंदूंचा इतिहास पालटला. हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण करून त्यांनी हिंदूंमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण केली आणि खोटा इतिहास त्यांच्यावर थोपवला.

श्री. कश्यप महर्षि

नास्तिकतावाद कर्करोगाप्रमाणे आहे. कथित विचारवंतांनी षड्यंत्र रचून हिंदूंच्या ग्रंथांचे विकृतीकरण केले आणि खोटा इतिहास लोकांसमोर मांडला. साम्यवाद्यांनी हिंदूंच्या इतिहासाचे विकृतीकरण करून समाजामध्ये नास्तिकतावाद पसरवला. नास्तिकतावाद पसरल्यामुळे समाजाची अधोगती झाली. कुटुंबव्यवस्था आणि आर्थिकव्यवस्था कोलमडली. विवाहव्यवस्थेवर परिणाम झाला.

– श्री. कश्यप महर्षि, राज्य अध्यक्ष, धर्मवीर अध्यात्म चैतन्य वेदिका, तेलंगाणा.