प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार ! – मुख्यमंत्री


छत्रपती संभाजीनगर
– ४ दिवसांनी आपण देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जाऊ लागलो.

‘जब तक सुरज चांद रहेगा, बाबासाहेबका संविधान रहेगा’, बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली.

तसेच शहराचा ‘डीपी प्लॅन’ हा सर्वांच्या हिताचा असेल तोच करू, अशी ग्वाहीही त्यांनी शहरवासियांना या वेळी दिली.