
१. प्रतिवर्षीपेक्षा या वर्षीचा महोत्सव आध्यात्मिक स्तरावर झाला.
२. सर्वांची मने जुळली होती. सर्व जण कुटुंबभावनेतून कार्य करत होते आणि सहभागी होत होते.
३. ‘सर्व जण साधनेविषयी मार्गदर्शन घेत होते आणि ते अंतर्मुख झाले होते’, असे मला जाणवले.
४. ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ उद्घोष गावागावांत पोचणे
गुरुदेवांनी १० वर्षांपूर्वी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ हा उद्घोष केला होता. तो आता गावागावांत पोचत आहे. आता अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्या कार्यक्रमाच्या आणि आंदोलनाच्या वेळी ही घोषणा देत आहेत. हा उद्घोष सर्वांचा उत्साह वाढवणारा ठरत आहे. यातून गुरुदेवांचे द्रष्टेपण लक्षात येते.
५. ‘हिंदु राष्ट्र’ या सूत्रांवर संघटनांना एकत्रित करणारी हिंदु जनजागृती समिती !
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील अनेक संघटनांना हिंदु जनजागृती समितीचा आधार वाटतो. या संघटनांचे प्रतिनिधी जाहीर कार्यक्रमात ‘समिती समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करत आहे आणि समितीच्या समवेत कार्य केले पाहिजे’, असे सांगत होते. समिती ही ‘हिंदु राष्ट्र’ या सूत्रावर अनेक संघटनांना एकत्रित करणारी संघटना आहे’, अशी अनेक हिंदु संघटनांमध्ये श्रद्धा निर्माण झाली आहे.’
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक, हिंदु जनजागृती समिती.
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?