श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना दिलेला संदेश !

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी लागणारी सद्गुणांची शिदोरी जमा करा !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘अखिल मानवजातीचे कल्याण करणारा हिंदु राष्ट्र-स्थापनेचा काळ समीप आहे; मात्र ‘आपणांस तो सहजपणे अनुभवायला मिळेल’, असे नाही. त्यासाठी ईश्वरावरील दृढ भक्ती, सत् साठी त्यागाची सिद्धता, मनाची सर्वांगीण सिद्धता अशा सद्गुणांची शिदोरी आपल्यासोबत असली पाहिजे. ती साठवण्यासाठी गुरुपौर्णिमेसारखी अद्वितीय संधी नाही ! गुरुपौर्णिमेनिमित्त एक सहस्र पटींनी कार्यरत गुरुतत्त्वाचा लाभ मिळवण्यासाठी तन, मन आणि धन यांपैकी ज्या जमेल, त्या मार्गाने या उत्सवात, तसेच त्यातील सेवेत सहभागी व्हा ! गुरूंकडे ‘आम्हाला आपल्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी करून घ्या !’, अशी प्रार्थना तळमळीने करा. हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या गुरुकार्यात नित्य सहभागी व्हा अन् जीवनाचे सार्थक करून घ्या !’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी, सनातन संस्था