Bihar Hindu Family Attacked : मोहरमच्‍या मिवरणुकीतील धर्मांधांकडून एका हिंदु कुटुंबावर तलवारीद्वारे विनाकारण आक्रमण !

समस्‍तीपूर (बिहार) – येथील दरसिंहसराय येथे १४ जुलैला झालेल्‍या मोहरमच्‍या मिरवणुकीत सहभागी झालेल्‍या धर्मांधांनी रस्‍त्‍यावरून जाणार्‍या एका चारचाकी वाहनावर तलवार, हॉकी स्‍टिक आणि लाठी-काठी यांद्वारे आक्रमण केले. या चारचाकी वाहनातील अमितेश कुमार आणि साधना कुमारी हे दांपत्‍य आणि त्‍यांचा छोटा मुलगा, असे तिघे जण मधुबनीहून पटणा येथे निघाले होते. वाटेत ही घटना घडली. या आक्रमणात छोटा मुलगा घायाळ झाला आहे. धर्माधांनी त्‍यांच्‍या गाडीच्‍या काचा फोडल्‍या. या प्रकरणी या दांपत्‍याने पोलिसांत तक्रार केली आहे. या प्रकरणी ५ जणांना अटक करण्‍यात आल्‍याची माहिती पोलीस उपअधीक्षक विवेक यांनी दिली. पीडित दांपत्‍याने सांगितले की, घटना घडल्‍यानंतर पोलिसांना अनेकदा भ्रमणभाष करूनही पोलिसांनी तो उचलला नाही. (अशा पोलिसांना तात्‍काळ बडतर्फ करा. असे पोलीस जनतेचे काय रक्षण करणार ? – संपादक) मिरवणुकीत शेकडो धर्मांध सहभागी झाले होते. यातील धर्मांधांनी अनेक दुचाकीस्‍वारांनाही बेदम मारहाण केल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.

नवादा येथे फडकावला पॅलेस्‍टाईनचा झेंडा !

नवादा येथील धमौल बाजार येथे मोहरमच्‍या मिरवणुकीत पॅलेस्‍टाईनचा झेंडा फडकवण्‍यात आला. ‘न्‍यूज १८’ या वृत्तसंकेतस्‍थळाने हे वृत्त प्रसारित केल्‍यानंतर नवादा पोलिसांनी वादग्रस्‍त झेंडा जप्‍त करत तीन तरुणांना कह्यात घेतले. नवादा पोलिसांनीही त्‍याच्‍या सामाजिक माध्‍यमावरील खात्‍यावरून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यापूर्वीही येथे अशा घटना घडल्‍या आहेत.

संपादकीय भूमिका 

असे व्‍हायला समस्‍तीपूर भारतात आहे कि पाकिस्‍तानमध्‍ये ? हिंदूंची कणाहीनता, पोलिसांची निष्‍क्रीयता आणि सरकारची हतबलता यांमुळे धर्मांध उद्दाम बनले आहेत. यावर एकच उपाय आहे, तो म्‍हणजे हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना !