मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणात अनियमितता नाही ! – मंत्री उदय सामंत

विधान परिषदेतून…

उदय सामंत

मुंबई, ११ जुलै (वार्ता.) – मुंबईकरांना प्रतिवर्षी खड्ड्यांतून प्रवास करावा लागू नये, यासाठी डांबरीकरणाऐवजी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झालेली नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी १० जुलै या दिवशी विधान परिषदेत सांगितले. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य शशिकांत शिंदे, सचिन अहीर, अधिवक्ता अनिल परब, प्रवीण दटके आदींनी सहभाग घेतला.