मुंबई, २७ जून (वार्ता.) – केंद्रशासनाच्या सागरमाला प्रकल्पाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सागरी आणि जल मार्ग विकसित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या अंतर्गत अभ्यास करण्यासाठी शासनाने राज्य सागरी आणि जल मार्ग वाहतूक समितीची स्थापना केली आहे. जलमार्गाद्वारे राज्याच्या अंतर्गत वाहतूक विकसित करण्याच्या दृष्टीने आवश्यक सूत्रांचा ही समिती अभ्यास करणार आहे. राज्यशासनाच्या परिवहन आणि बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. या समितीमध्ये महाराष्ट्र सागरी मंडळ, गृह विभाग, मुंबई बंदर प्राधिकरण, मत्स्यव्यवसाय, मध्य रेल्वे विभाग या विभागांचे अधिकारी सदस्य म्हणून कार्यरत असणार आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > महाराष्ट्रातील सागरी आणि जल मार्ग विकसित केले जाणार !
महाराष्ट्रातील सागरी आणि जल मार्ग विकसित केले जाणार !
नूतन लेख
- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदीहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान !
- राष्ट्रपुरुषांची जयंती तिथीनुसार साजरे करण्याला जितेंद्र आव्हाड यांचा विरोध !
- Mukhyamantri Tirtha Darshan : ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य देवदर्शन घडवणार !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : डंपरच्या धडकेत पोलीस शिपाई ठार !; भिंत कोसळून वृद्ध घायाळ !…
- ठाणे येथे लैंगिक अत्याचाराचे जाळे उद्ध्वस्त !
- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री