‘समाजप्रबोधन आणि समाजोन्नती यांसाठी कटीबद्ध असलेल्या ‘सनातन प्रभात’चे नामकरण कधी आणि कसे झाले ?’, याविषयीचा प्रसंग आहे.

वर्ष १९९७ मध्ये प.पू. डॉ. आठवले यांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) सिंधुदुर्ग येथील देवगड तालुक्यात सार्वजनिक सभा होती. त्या निमित्ताने गुरुदेवांची पडेल येथील डॉ. रविकांत गोविंद नारकर यांच्याकडे निवासव्यवस्था होती. त्या वेळी डॉ. दुर्गेश सामंत, डॉ. नंदिनी सामंत आणि सांगलीतील इतर अन्य साधक, असे पुष्कळ जण आले होते. तेव्हा सर्वांना एकत्र करून दैनिक ‘सनातन प्रभात’चा आराखडा ठरवला जात होता.
गुरुदेवांनी उपस्थित सर्वांना ‘दैनिकाचे नाव काय असावे ?’, असे विचारले. ‘सनातन संदेश’, ‘सनातन प्रेरणा’, ‘सनातन प्रभात’, अशी नावे सुचवली गेली आणि त्यातील ‘सनातन प्रभात’ या नावाची निवड झाली. या ऐतिहासिक आणि दैवी घटनेची साक्षीदार होण्याची अनमोल संधी परमभाग्याने मला लाभली.
– सौ. ज्योत्स्ना रविकांत नारकर, पडेल, ता. देवगड, सिंधुदुर्ग. (१०.४.२०२४)
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !