‘समाजप्रबोधन आणि समाजोन्नती यांसाठी कटीबद्ध असलेल्या ‘सनातन प्रभात’चे नामकरण कधी आणि कसे झाले ?’, याविषयीचा प्रसंग आहे.

वर्ष १९९७ मध्ये प.पू. डॉ. आठवले यांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) सिंधुदुर्ग येथील देवगड तालुक्यात सार्वजनिक सभा होती. त्या निमित्ताने गुरुदेवांची पडेल येथील डॉ. रविकांत गोविंद नारकर यांच्याकडे निवासव्यवस्था होती. त्या वेळी डॉ. दुर्गेश सामंत, डॉ. नंदिनी सामंत आणि सांगलीतील इतर अन्य साधक, असे पुष्कळ जण आले होते. तेव्हा सर्वांना एकत्र करून दैनिक ‘सनातन प्रभात’चा आराखडा ठरवला जात होता.
गुरुदेवांनी उपस्थित सर्वांना ‘दैनिकाचे नाव काय असावे ?’, असे विचारले. ‘सनातन संदेश’, ‘सनातन प्रेरणा’, ‘सनातन प्रभात’, अशी नावे सुचवली गेली आणि त्यातील ‘सनातन प्रभात’ या नावाची निवड झाली. या ऐतिहासिक आणि दैवी घटनेची साक्षीदार होण्याची अनमोल संधी परमभाग्याने मला लाभली.
– सौ. ज्योत्स्ना रविकांत नारकर, पडेल, ता. देवगड, सिंधुदुर्ग. (१०.४.२०२४)
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !