ED Seized Money : घोटाळ्यांतून लुटण्यात आलेले ३ सहस्र कोटी पुन्हा गरिबांना देण्यासाठी कायदा करणार ! – पंतप्रधान मोदी यांचे आश्‍वासन !

भाजपच्या उमेदवार राजमाता अमृता राय व पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – बंगालच्या गरिबांकडून घोटाळ्याच्या माध्यमांतून लुटलेले ३ सहस्र कोटी रुपये अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केले आहेत. हे पैसे त्या लोकांना परत केले जाण्यासाठी कायदा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. बंगालमधील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार राजमाता अमृता राय यांच्याशी दूरभाषवर चर्चा करतांना पंतप्रधान मोदी यांनी राय यांना याविषयी सांगितले. तसेच याविषयी निवडणूक प्रचाराच्या वेळी लोकांना सांगण्यासही सांगितले. अमृता राय या राजघराण्यातील सदस्य आहेत.

संपादकीय भूमिका

प्रत्येक घोटाळ्यातील आरोपींकडून जप्त केलेले पैसे संबंधितांना परत केले पाहिजेत आणि यासाठी कायदा होणार असेल, तर जनतेला आनंदच आहे !