४० तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या पोलिसांना कारागृहात टाका !

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

‘जरीमरी, साकीनाका (मुंबई) येथे १४ मार्च २०२४ या दिवशी एका कट्टरपंथियाने धार्मिक तेढ निर्माण करून स्थानिक हिंदु कुटुंबावर जीवघेणे आक्रमण केले होते. यात ५ हिंदू गंभीर घायाळ झाले. आता पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित कुटुंबाची चौकशी केली. मंत्री लोढा यांनी संशयित व्यक्तीचे बेकायदेशीररित्या उभे केलेले ५ मजली घर तोडण्याचे निर्देश दिले. महापालिकेने त्याप्रमाणे कारवाई चालू केली असून घराचा केवळ तळमजलाच पाडणे शेष आहे. नागरिकांनी या प्रकरणी पोलिसांत ४० तक्रारी प्रविष्ट करूनही पोलिसांनी याकडे कानाडोळा केला होता. ’ (२१.३.२०२४)