देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्‍या राष्ट्रद्रोह्यांना कारागृहात टाकायला हवे !

‘मोगल काळात तोडल्या गेलेल्या लक्षावधी मूर्ती, मंदिरे, तसेच कोट्यवधी निष्पाप आणि निर्दाेष हिंदूंचा भयानक नरसंहार अन् धर्मांतर हा आमची निष्क्रीयता अन् नपुंसकता यांचाच परिणाम होता. जर मोगल काळात हिंदूंच्या मानबिंदूंच्या रक्षणार्थ उभे रहाणारे राणा संगा, महाराणा प्रताप, समर्थ रामदासस्वामी, राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंह, छत्रसाल इत्यादींचे अभियान यशस्वी झाले असते, तर आमचा इतिहास एवढा कष्टदायक झाला असता का ? याच शृंखलेत भारताचे महान सुपुत्र स्वामी दयानंद सरस्वती, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. हेडगेवार इत्यादींची राष्ट्रवादी नीती समजून घेतली असती, तर आज पाकिस्तानची निर्मिती झालीच नसती. आजसुद्धा आम्ही देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्‍यांना कारागृहात टाकण्याऐवजी राजकीय पातळीवर सन्मानित होतांना पहात आहोत. राजकीय द्वंद्व, व्यक्तीगत स्वार्थ आणि सत्तालोलुपता यांमुळे आपण राष्ट्रीयत्वाचा गळा घोटत रहाणार आहोत का ?’

– श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश