SUKKUR MASSACRE 1939 : वर्ष १९३९ मध्ये आजच्या पाकमधील सक्खर शहरात ४० सहस्र हिंदूंचा झाला होता नरसंहार !

पाकिस्तानमधील हिंदूंसाठी कार्य करणारे मुंबईतील महेश वासू यांनी प्रसारित केला व्हिडिओ !

छायाचित्र सौजन्य : Mahesh Vasu

मुंबई – भारत स्वतंत्र होण्यापूर्वी नोआखाली, मोपला इत्यादी ठिकाणी हिंदूंचा मोठ्या प्रमाणात नरसंहार झाल्याचे आपल्याला ठाऊक आहे; परंतु वर्ष १९३९ मध्ये सिंध प्रांतातील सक्खर येथे झालेल्या हिंदूंचा नरसंहार हा त्यांच्याहूनही अधिक भयानक होता. हा नरसंहार आपल्यापासून जाणीपूर्वक लपवून ठेवण्यात आला होता. सुक्कूर शहर आता पाकिस्तानात आहे.

हिंदूंच्या हाती अधिकार असल्याच्य रागातून हत्याकांड

त्या काळी सक्खर शहराच्या ७० सहस्र एवढ्या लोकसंख्येपैकी ४० सहस्र हे हिंदू होते. हिंदू बहुसंख्य असल्याने तेथील प्रशासन आणि महत्त्वपूर्ण विभाग यांचे नियंत्रण साहजिकच हिंदूंकडे होते. हे मुसलमानांना आवडले नाही. त्यांनी हत्या, भूमींवर अतिक्रमण, चोर्‍या, फसवणूक आदी जी इस्लामची खरी ओळख आहे, त्या माध्यमातून तेथील हिंदूंचा नरसंहार चालू केला. १३ ऑक्टोबर १९३९ या दिवशी साई जी.एम्. सय्यद याच्या नेतृत्वाखाली मुसलमानांनी एक इमारत त्यांची मशीद असल्याचे सांगून आंदोलन केले. भारतीय पुरातत्व विभागाने ती मशीद नसल्याचे स्पष्ट केले होते, तरीही मुसलमानांनी त्यावर नियंत्रण मिळवले. पुढे १ नोव्हेंबर १९३९ या दिवशी मुसलमानांनी आंदोलनाच्या नावाखाली भक्त कवर राम या संतांची गोळ्या घालून हत्या केली. १९ नोव्हेंबर १९३९ या दिवशी साई जी.एम्. सय्यद आणि सर्व मुसलमान आंदोलक यांना ब्रिटीश पोलिसांनी अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ २० नोव्हेंबरपासून सुक्कूरच्या मुसलमानांनी हिंदूंची दिवसाढवळ्या हत्या करण्यास आरंभ केला. एकाच दिवसात सहस्रावधी हिंदूंना ठार करण्यात आले. दुसर्‍या दिवसापर्यंत तब्बल ४० सहस्र हिंदूंपैकी केवळ ९० हिंदूच शिल्लक राहिले. सक्खर शहराजवळ असलेल्या गुसारजी गावातील सर्व हिंदूंना ठार करण्यात आले. या वेळी १ सहस्र ५०० मुसलमानांना अटक करण्यात आली. मुस्लिम लीगचे सचिव पीर अली महंमद राशदी याला अटक करण्यात आली. ही सर्व माहिती महंमद राशदी यांनीच एका मुलाखतीतून दिली होती.

हिंदूंच्या धर्मांतराचा अड्डा बनलेला बरचुंडी दर्गा !

या संपूर्ण नरसंहाराचे मुख्य सूत्रधार हे साई जी.एम्. सय्यद, अब्दुल्ला हारूद, पीर अली महंमद राशदी , बरचुंडी दर्ग्याचे मौलवी आणि जकरानी बलोच गटाचे गुंड होते. बरचुंडी दर्गा तोच आहे, ज्याचा आजचा प्रमुख हा मियां मिठ्ठू आहे. याच्या नेतृत्वाखालीच पाकिस्तानमध्ये सहस्रावधी हिंदु मुलींचे बलपूर्वक धर्मांतर, निकाह, हत्या केल्या जात आहेत.