
ठाणे, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – कल्याण येथे दुचाकी उभी करण्यावरून वाद घालत १० ते १५ धर्मांधांनी हिंदु औषध विक्रेत्यावर आक्रमण केले. यात दोघे घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या प्रकरणी ५ जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. १० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
‘ये हिंदु है, इनको मारो, इनको छोडो मत ।’, ‘ये योगीराज नहीं है तुम्हारा, और ये अयोध्या नहीं है ।’, असे धर्मांध या वेळी म्हणत होते. या वेळी धर्मांधांनी हिंदु औषध विक्रेत्याचे कपडे फाडले. लोखंडी सळीने त्यांच्या डोक्यावर प्रहार करत लाथाबुक्क्यांनी मारले. जमीर कादिर शेख उपाख्य जमील काझी (वय ३४ वर्षे), महंमद सलीम इब्राहीम खान (वय ५४ वर्षे), शाहरूख जाफर शेख (वय ३१ वर्षे), फुरकान अख्तर पठाण, (वय २४ वर्षे), रौफ मेहमुद शेख (वय ४३ वर्षे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
संपादकीय भूमिकाधर्मांधांची वारंवार होणारी आक्रमणे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! |
कल्याण-डोंबिवली येथे १ लाख ३ सहस्र ६९० रुपयांचा विनापरवाना औषधसाठा जप्त
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !
आषाढी वारीत ‘आयुर्वेद व्यासपिठा’ची वारकर्यांसाठी आरोग्यसेवा !
अजिंक्यतारा आणि संगम माहुली विकासकामांना प्रशासकीय मान्यता ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !