
पुणे – येथील सुतारदरा भागात २६ जानेवारीला १६-१७ जणांच्या ख्रिस्ती मिशनर्यांच्या समूहाने ‘येशू सर्वांचे भले करतो, हिंदूचे देव पाण्यात टाकले की बुडून जातात, जो स्वतः बुडतो तो इतर भक्तांना काय वाचवणार ?’, अशी विधाने करत परिसरातील गरीब हिंदु कुटुंबांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. (हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी सरकार धर्मांतरबंदी कायदा केव्हा करणार ? – संपादक) याविषयी माहिती मिळताच स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी हा धर्मांतराचा डाव उधळला आणि ३ कुटुंबांना धर्मांतरित होण्यापासून वाचवले. ‘स्वारद फाउंडेशन’च्या संस्थापिका स्वातीताई मोहोळ, रवींद्र पडवळ, ऋतुजा माने, महेश खोपकर, किसन काळोखे, रवींद्र शेळके, ‘ओम साई मित्र मंडळा’तील युवक आणि दत्तनगर परिसरातील स्थानिक महिला अन् युवक यांनी धर्मांतर करायला आलेल्या मिशनर्यांना पकडले आणि त्यांना शास्त्रीनगर पोलीस चौकी येथे कारवाईसाठी पोलिसांच्या कह्यात दिले.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण