नयानगरमध्ये (ठाणे) ‘जय श्रीराम’ची घोषणा नाही दिली, तर माझे नाव पालटा !

  • भाजपचे आमदार नीतेश राणे यांचे हिंदूंना पत्रकार परिषदेद्वारे आव्हान !

  • माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास आक्रमक होणार असल्याची चेतावणी !

आमदार नीतेश राणे

मीरारोड (ठाणे) – येथील नयानगर येथे दंगलीच्या वेळी १०० ते २०० मुसलमान आल्याचे प्रत्यक्षदर्शी हिंदूंनी सांगितले होते; पण केवळ १२-१३ लोकच आल्याचे पोलीस सांगतात. पोलीस अशांचे लाड करतात. पोलिसांनी जर आता हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हे नोंद केले, तर आम्ही कुणालाच सोडणार नाही. नयानगरमध्ये ‘जय श्रीराम’ची घोषणा नाही दिली, तर माझे नाव पालटून टाका, असे आव्हान भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी दिले. नयानगर येथे हिंदूंवर आक्रमण करून दंगल घडवल्याप्रकरणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते. या वेळी त्यांनी या घटनेच्या संदर्भात पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून केल्या जाणार्‍या हलगर्जीपणाविषयी खेद व्यक्त केला.

(सौजन्य : Metro Mumbai)

ते पुढे म्हणाले,…

१. ज्या ठिकाणी मुसलमानांनी दंगली घडवल्या, त्या त्या ठिकाणी कारवाई होईल. या धर्मांध मुसलमानांचा उद्दामपणा ठेचून काढायचा आहे.

२. नयानगर भागात पोलिसांनी कुणालाही न विचारता लावलेले बॅरिकेट्स २४ घंट्यांत काढावेत. आता येथे कुणाचे लाड केले जातात, ते आम्ही पहातोच. तुमच्यामुळे आमचे सरकार अपकीर्त होत आहे. मी तुमच्या निलंबनाची मागणी करतो, मग रडायचे नाही. त्या वेळी जिहादी वाचवायला येणार नाहीत. (अशा शब्दांत नीतेश राणे यांनी पोलीस आयुक्तांना सुनावले.)

३. नयानगरमध्ये ३५ हिंदु मुलींचे धर्मांतर करण्यात आले. ज्यांना हे नयानगर ‘नया पाकिस्तान’ वाटत असेल, तर ते आम्ही सहन करणार नाही.

४. तोंडात बोट घालून आमच्या बजरंगबलीच्या चित्रावर या मुसलमानांनी उलटी केली, त्यावर ते थुंकले, हिंदु माता-भगिनींना पकडून मारले. मारतांना ‘अब तेरा राम बचाने आयेगा क्या ?’ असे म्हटले गेले. पुन्हा आमच्या माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास आम्हीपण आक्रमक होऊ. महिलांकडे वाकड्या नजरेने बघितले, तर त्याचे डोळेच ठेवणार नाही. आता नयानगरचे लाड नकोत. तुमच्या मोहरमच्या वेळी आम्ही धिंगाणे घातले आणि ‘उपरवाला बचाने आयेगा क्या’, असे म्हटले तर चालेल का ?

५. आम्ही ८० टक्के आहोत, हे मुसलमानांनी लक्षात घ्यावे. पोलिसांनी आता काही केले नाही, तर आम्ही बघू.