पुणे – तलाठी परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचे वृत्त हेतूपुरस्सर पसरवले जात आहे; मात्र परीक्षेत कोणताही घोटाळा झाला नाही. गुणवत्ता सूची नियमानुसारच लावलेली आहे, असा दावा प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकार्यांनी केला. तलाठी पदाच्या परीक्षेसाठी राज्यात १० लाख ४१ सहस्र ७१३ परीक्षार्थींनी अर्ज केले होते, त्यापैकी ८ लाख ६४ सहस्र ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. ‘या परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना २०० हून अधिक सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. त्यामुळे तलाठी भरती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून याची चौकशी करावी’, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. ‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असो कि सरळ सेवा भरतीच्या परीक्षा असो या परीक्षांमधील पारदर्शकता पूर्णपणे संपली असून कष्ट करणार्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे’, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > तलाठी परीक्षेमध्ये घोटाळा झाला नसल्याचा वरिष्ठ अधिकार्यांचा दावा !
तलाठी परीक्षेमध्ये घोटाळा झाला नसल्याचा वरिष्ठ अधिकार्यांचा दावा !
नूतन लेख
- हडपसर (पुणे) येथे श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालख्यांच्या मुक्कामाची सिद्धता !
- छत्रपती संभाजीनगर येथे रॅगिंग करणारे ३ विद्यार्थी निलंबित !
- विशाळगडावर (जिल्हा कोल्हापूर) ‘ती’ जागा सोडून अन्य कुठेही पशूबळी दिला गेल्यास कायदा-सुव्यवस्थेचे दायित्व प्रशासनाचे ! – विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती
- महाराष्ट्रातील धर्मादाय रुग्णालयांत ७ महिन्यांत ५०० हून अधिक गरीब रुग्णांवर उपचार !
- Suresh Gopi : (म्हणे) ‘इंदिर गांधी ‘मदर ऑफ इंडिया’ ! – केंद्रीय मंत्री सुरेश गोपी
- राज्यात आजपासून वीज दरवाढ