पुणे येथून सुटणार्‍या महत्त्वाच्या गाड्या २५ दिवस रहित !

पुणे – आग्रा विभागातील पलवन-मथुरा जंक्शन येथे यार्ड रिमॉडलिंगच्या कामासाठी पुणे  येथून सुटणार्‍या १६ एक्सप्रेस गाड्या १० फेब्रुवारीपर्यंत रहित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उत्तरेत जाणार्‍या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. ‘प्रवाशांनी गाडीची चौकशी केल्याविना तिकीट काढू नये’, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.  दक्षिण भारत आणि पुणे येथून उत्तरेत जाण्यासाठी महत्वाच्या गाड्या ६ फेब्रुवारीपर्यंत रहित असणार आहेत.