Archbishop Charles Scicluna Demands : पाद्रयांना विवाह करण्याची अनुमती दिली पाहिजे !

  • पोप फ्रान्सिस यांचे वरिष्ठ सल्लागार आर्चबिशप चार्ल्स साईक्लूना यांचे विधान

  • साईक्लूना यांनी केली होती पाद्रयांनी केलेल्या मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांची चौकशी !

आर्चबिशप चार्ल्स साईक्लूना

व्हॅटिकन सिटी – पाद्रयांना विवाह करण्याची अनुमती दिली पाहिजे. याविषयी रोमन कॅथॉलिक चर्चने गांभीर्याने विचार केला पाहिजे. कदाचित् मी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या असे विधान करत आहे, असे ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे ज्येष्ठ सल्लागार असणारे माल्टाचे आर्चबिशप (वरिष्ठ पाद्री) चार्ल्स साईक्लूना यांनी म्हटले आहे. चार्ल्स साईक्लूना यांनी पाद्रयांनी केलेल्या मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांची चौकशी केली होती. त्यामुळे त्यांनी केलेल्या वरील विधानाला अधिक महत्त्व आहे.

पाद्रीही कुणाच्या तरी प्रेमात पडू शकतात !

चार्ल्स साईक्लूना म्हणाले की, पाद्रयांना पहिल्या १ सहस्र वर्षांमध्ये विवाहाची अनुमती होती. हा इतिहास नमूद आहे. जर माझ्या अधिकारात असते, तर मी ‘पाद्रयांना ब्रह्मचर्येचे पालन करावे लागते’, या नियमाचे संशोधन केले असते. यामुळे चर्चला अनेक चांगल्या पाद्रयांना गमवावे लागले आहे; कारण अशांनी पाद्री बनण्याऐवजी विवाह करण्याचा निर्णय घेतला. माझ्या अनुभवातून लक्षात येते की, पाद्रयांच्या विवाहाच्या अनुमतीविषयी गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. चर्चमध्ये ब्रह्मचर्येला निश्‍चित एक स्थान आहे; मात्र हाही विचार करायला हवा की, कधी कधी पाद्रीही कुणाच्या तरी प्रेमात पडू शकतात. अशा वेळी पाद्रयांना त्यांची प्रेयसी किंवा ‘पाद्रीपद’ यांपैकी एक निवडावे लागते. काही पाद्री तर असे संबंध लपवून ठेवतात.

संपादकीय भूमिका 

  • स्वतःला विकसित आणि आधुनिक मानणार्‍या देशांतील ख्रिस्त्यांना ब्रह्मचर्येचे पालन करण्यासारख्या कठीण गोष्टी केवळ आणि केवळ अशक्य आहे; मग ते पाद्री असोत कि सामान्य नागरिक ! त्यामुळेच पाद्रयांनी लैंगिक शोषण केल्याच्या सहस्रो घटना उघडकीस आल्या. या परिस्थिमुळेच आता पाद्रयांना विवाहाची अनुमती देण्याची मागणी करण्याची वेळ याच पाद्रयांवर आली आहे !
  • हिंदु धर्मातील साधू, संन्यासी आणि संत ब्रह्मचर्येचे पालन करू शकतात; कारण त्यांना ‘साधनेद्वारे इंद्रियांचे नियमन कसे करायचे ?’ हे ठाऊक असून ते तसे करूही शकतात; मात्र अन्य धर्मियांना ते ठाऊकही नाही आणि त्यांची तशी साधनाही नाही, ही वस्तूस्थिती आहे !
  • षड्रिपूमध्ये ‘काम’ याला पहिले स्थान आहे. व्यक्तीला जेव्हा अद्वैताची अनुभूती येते, तेव्हा काम नष्ट होतो. त्या स्थितीला जाईपर्यंत वासनेचे विचार मनामध्ये उणे-अधिक प्रमाणात असतात. ही स्थिती प्राप्त करण्यासाठी तशी साधना करणेही आवश्यक असते !