पहाटे ५ वाजेपर्यंत परवानाकृत हॉटेल चालू ठेवण्याची मागणी – ‘हॉटेल व रेस्तरां असोसिएशन पश्चिम भारत’

‘हॉटेल व रेस्तरां असोसिएशन पश्चिम भारत’ (हरवी)

मुंबई : नाताळ आणि ३१ डिसेंबर या पार्श्वभूमीवर पहाटे ५ वाजेपर्यंत अधिकृत हॉटेल चालू ठेवण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी राज्यभरातील हॉटेल व्यावसायिकांची संघटना ‘हॉटेल व रेस्तरां असोसिएशन पश्चिम भारत’ (हरवी) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

असोसिएशन कायम नियमांच्या अधीन असून कायदेशीर व्यवसायाला बळ देते; म्हणून अनुमती मिळावी, असे पत्र त्यांनी राज्याचे प्रधान सचिव (गृह) राधिक रस्तोगी, पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना लिहिले आहे.